बिहार : भारतातील एक गरीब राज्य आता मालामाल होणार आहे. कारण, या गावात असा खजिना सापडला आहे की, यामुळे राज्यातल्या सगळ्यांचे नशीब पालटणार आहे. या राज्याच्या दोन गावांमध्ये सोन्याचा मोठा साठा सापडल्याची माहिती आहे.
देशातील ४४ टक्के सोन्याचा साठा बिहारच्या जमुई जिल्ह्यात असल्याचे आधीही पुढे आले होते. पण यासोबतच आता शेजारील बांका जिल्ह्यातील कटोरिया गावातही जमिनीत असलेले सोने तपासणीसाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण काम करत आहेत.
जमुई जिल्ह्यातील सोनो परिसरामध्ये सोन्याचा मोठा साठा हाती लागण्याची अपेक्षा आता आणखी वाढली आहे. काही महिन्यांआधी केंद्र सरकारच्या खनिज मंत्र्यांनी संसदेत देशातल्या ४४ टक्के सोन्याचा साठा जमुई जिल्ह्यातील सोनोमध्ये सापडल्याची माहिती दिली होती. आता जमुईनंतर बांका इथेही सोने मिळाल्याने आता बिहार मालामाल होणार आहे.