Saturday, April 20, 2024
Homeताज्या घडामोडीसाखर कारखान्याच्या माध्यमातून मोहोळमध्ये 26 कोटी रुपयांची वीज निर्मिती

साखर कारखान्याच्या माध्यमातून मोहोळमध्ये 26 कोटी रुपयांची वीज निर्मिती

सोलापूर :  मोहोळ तालुक्यातील चार साखर कारखान्याच्या माध्यमातून दोन महिन्याच्या कालावधीत 26 कोटी रुपयांची पाच कोटी 47 लाख युनिट वीज निर्मिती झाली आहे. यातील काही विज कारखान्यांनी वापरली आहे तर उर्वरित वीज एक्सपोर्ट केली आहे. या वीज निर्मिती मुळे साखर कारखान्यांना अतिरिक्त महसूल प्राप्त झाला असून, शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला प्रति टन जादा भाव मिळण्याची आशा लागली आहे.

मोहोळ तालुक्यात भीमा, जकराया, आष्टी शुगर व लोकनेते हे चार साखर कारखाने आहेत. सध्या या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोरात सुरू आहे. साखर कारखाने सुरू होऊन साधारण दोन महिने झाले आहेत वरील वीज निर्मिती ही या कालावधीतील आहे. कारखानदारांचे केवळ ऊस गाळप करून त्यापासून फक्त साखर उत्पादन सुरू आहे. सारासार विचार केला व वाढत्या खर्चाचा हिशोब घातला तर फक्त साखर उत्पादन ही न परवडणारी बाब आहे. त्यासाठी उपपदार्थ निर्मिती असेल तर ऊस उत्पादक सभासदांना ज्यादा भाव देणे शक्य होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -